शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

दांडी-वायरी किनार्‍यावर ७० टन मासळी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:12 IST

मालवण : ओखी वादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीतील मच्छिमार नौका व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात कोसळलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणाºया आणि नुकसानीमुळे चिंताग्रस्त दर्याराजासाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओखीच्या तडाख्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, छोट्या मच्छिमारांना तारण्यासाठी ‘तारली’ मासळी धावून आली ...

मालवण : ओखी वादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीतील मच्छिमार नौका व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात कोसळलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणाºया आणि नुकसानीमुळे चिंताग्रस्त दर्याराजासाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओखीच्या तडाख्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, छोट्या मच्छिमारांना तारण्यासाठी ‘तारली’ मासळी धावून आली आहे.दांडी-वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीच्या जाळ्यात अपेक्षेपेक्षा जास्त अशी तब्बल ७० टन मासळी सापडली. यामुळे दांडी-वायरी किनारपट्टीवर तारली मासळीचा खच पडला होता. ती एकत्र करून निर्यात करण्याचे काम रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पारंपरिक मच्छिमारांच्या रापणीत मासळी मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दांडी-वायरी परिसरात तोडणकर यांचा पारंपरिक रापण संघ आहे. याच रापण संघाला ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. यात रापणीच्या नौकेचे नुकसान झालेच शिवाय जाळीही तुटून गेल्याने रापण संघावर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर आठवडाभर बंद असलेली मासेमारी दोन दिवसांपासून पूर्वपदावर येत आहे. दांडी येथील समुद्रात नारायण तोडणकर रापण संघाने शनिवारी रात्री जाळी मारली होती. त्यानंतर रविवारी सकाळी जाळी ओढताना अनपेक्षित तारली मासळी जाळ्यात सापडून आल्याने मच्छिमारांना आश्चर्याचा धक्काच बसला. एक-एक करता करता १०० खंडीपेक्षा जास्त मासळी तुळस-वेंगुर्ले येथील आकाश फिश मिल येथे निर्यात करण्यात आली. यावेळी समुद्रकिनाºयावर मासळी वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांनी बंपर तारलीचा आनंद लुटला.किनारपट्टीवर दूरवर पसरला मासळीचा खचनारायण तोडणकर रापण संघाला संकटातून मार्ग काढण्यासाठी निसर्गच धावून आला. नुकसानग्रस्त रापण संघाला निसर्गाने रविवारी भरभरून तारलीची देणगी देत कोसळलेल्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न केला. वायरी किनारपट्टीवर लावण्यात आलेल्या रापणीत १०० खंडीपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे ७० टनपेक्षा जास्त तारली मासळी मिळाली. काही किलोमीटर लांब असलेल्या रापणीचे जाळे मासळीने तुडुंब भरून गेले. तरीही वाहून जाणारा मासळीचा खच किनारपट्टीवर दूरवर पसरला होता.